Wednesday, December 15, 2010

माझे "खाण्या" वरचे प्रेम !!!

बर्याच वेळा मित्र एकमेकांशी फोन वर तास भर बोलतात आणि मग सगळ बोलुन झाल्यावर काही विषय उरला नाही की मग "काय ... झालं का जेवण ?" हा प्रश्न विचारतात ... हा प्रश्न आला की समजावे की फोन ठेवण्याची वेळ झाली... मी या गोष्टी बद्दल किंवा या प्रकारा बद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतो... "जेवण झाले का?" किंवा "आज काय बेत?" या सारख्या interestsing topic पासुन गोष्ट सुरु करण्या ऐवजी शेवट करणे कसे शक्य आहे ?

या गोष्टीचे महत्व हे केवळ "वाढता वाढता वाढे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य आहे तेच लोकं समजु शकतील ... एकंदरीत खादाडीवर अमाप प्रेम असणार्या मझ्या असंख्य बांधवांचा मला पाठींबा आहे असे मी येथे ग्रुहित धरतो... :-)

आता आमचे घारपुरे ... "आज काय बेत?" यावर आठवड्यातुन तीन वेळेस तरी "शिकरण" असेच उत्तर देतात ... मग मी पण तेच ते "खा लेकहो ... शिकरण पोळी खा...मटार उसळ खा" असे बोलुन माझं पु.ल. प्रेम व्यक्त करतो ..... अशा प्रकारे पु. लं. ची आठवण करुन देणारी गोष्ट म्हणजे "खादाडी वरचे प्रेम" याला प्रचंड महत्च प्राप्त व्हयला पाहीजे हे मी अगदी "सिरसम जिल्हा झालाच पाहीजे" या उत्साहात म्हणतो...

एकंदरीत ’खाणे’ या गोष्टीवर माझे प्रचंड प्रेम आहे ते तुमच्या लक्षात आले असेलच... माझी ती gtalk वरची status line तर तुम्हाला माहीत आहेच .... "I am on a see (sea?) food diet ... whenever I see food, I eat" ...तर....मी कधीही खाऊ शकतो..जशी चहाची काही ठरावीक वेळ नसते तशी खाण्याला पण वेळ नसते या मताचा मी ... प्रवास म्हणजे तर माझ्या सारख्या खवय्ये मंडळींना आनंदाची पर्वणीच...आणि आता प्रवासा दरम्यान खाण्या मध्ये तुम्ही Hygiene सारख्या क्षुल्लक गोष्टी आणु नका राव...आता...पाणि पुरी बनवणारा माणुस जितका अस्वछ तितकी पाणि पुरी चविष्ट हा जग मान्य नियम आहे की नाही? त्यामुळे let's not talk about hygiene ....(म्हणल की विंग्रजी शब्दा बद्दल बोलताना एक तरी विंग्रजी वाक्य टाकाव ... :-) )

आता मागच्या India trip मध्ये फक्त २ दिवस होतो औरंगाबाद ला..त्यात सुढ्हा(हा शब्द फार महत्वाचा आहे हा:-) ) तर त्यात सुढ्हा एका रात्री बायकोला घेऊन क्रांती चौकातल्या सगळ्यात कोपर्यातल्या अंधारातल्या पाव-भाजी च्या गाड्यावर पाव-भाजी खायला घेउन गेलो...अंधार नसता तर तीला कळाले असते ना की तो पाव-भाजी वाला कसा आहे ते....छे.... काही केल्या बायको तयार होइना... मी एकटयानेच मिटक्या मारत पाव-भाजी खाल्ली ... बायको ला क्रांती चौकात पाव-भाजी खायला घेऊन जाण्याचे महत्व माझ्या सारखे औरंगाबाद प्रेमीच जाणणार म्हणा.... :-)

एखादा problem असेल तर त्याच्या मुळाशी जायचे आणि तिथेच तो सोडवायचा हा माझा मुळ स्वभाव .. (जरा अति झालं का? ..अहो..आता काय करणार...बाकी कोणी बोलत नाही म्हणुन स्वतःच सांगितले ...असो...) तर...त्या प्रमाणे कधी माझी बायको म्हणाली की डोके दुखत आहे किंवा पोट दुखत आहे तर मी पटकन त्या प्रश्नांच्या मुळाशी जातो आणि तीला सुचवतो की ’तुला भुक लागली असेल’ .... झालं... बायको बाकी सगळे मान्य करेल पण हे मान्य करायला तयारच नाही.... अहो....जगातले इतके मोठे-मोठे problem "खाण्याने" सुटतात ..इथे तर फक्त डोके दुखणे अशी साधी बाब आहे....अस्सो.....

तर मुळ मुद्दा काय ? .. काय ? मुळ असा काही मुद्दाच नाही? ...नसु द्या.....पण एकच महत्वाचे .... खाण्यावर प्रेम करा ... :-)

या विषयावर आपण बोलतच आहोत म्हणुन अठवले .... तुम्ही जर खरच रसिक ’खाणारे’ असाल तर तुम्ही एक funda मान्य कराल ... तो म्हणजे "फुकट ते पौष्टीक" .... ऊगाच काही नाही... ...अहो...... office च्या meetings दरम्यान मिळणारे pizza , buscuit, softdrink पासुन ते पंचतारांकीत होटेल मध्ये होणारे lunch, dinner, BBQ हे सर्व याच प्रकारात मोडतात ..... आपल्याला तर बुवा आवडले असले सगळे ... म्हणजे meetings मधल्या discussion पेक्षा पण खायला काय आहे यावर जर ती meeting किती महत्वाची हे कोणी ठरवत असेल तर मी त्या माणसाचा मना पासुन आदर करतो ..... :-)

चला .... बराच वेळ झाला.... नुसता लिहीतोच आहे.... भुक लगली.... काहीतरी खाऊन येतो... :-)